Count Down Begins!

Happy holidays!

×
Logo Design by FlamingText.com

भाषिक खेळ.श्री येवतीकर सर












मित्रांनो,
           आपल्यापैकी बरेच शिक्षक शाळा पातळीवर अनेक उपक्रम,खेळ घेतात.श्री .नागोराव येवतीकर (शिक्षक तथा लेखक )यांचे अनेक भाषिक खेळ या सदरात आपल्याला उपलब्ध करुन देताना मला आनंद होतोय .या खेळांचा शाळेवर फायदाच होईल .




                                          अल्प परिचय         
                                   नागोराव सा.येवतीकर 
                                 मु.येवती,पोस्ट-येताळा 
                                 ता.धर्माबाद,जी.नांदेड.
            व्यवसाय-
           प्राथमिक शिक्षक.जी.प.हायस्कूल,करखेली,ता.धर्माबाद,जी.नांदेड.
           जन्मदिनांक-२६ एप्रिल १९७६.

शालेय जीवनापासूनच लिखाण करण्याची आवड.विविध मासिके,वर्तमानपत्रे,दैनिक,साप्ताहिक,वैचारिक लेखांचे लिखाण.जीवन-शिक्षण या शैक्षणिक मासिकातून यापूर्वी अनेक लेख प्रकाशित.सध्या दैनिक लोकपत्रच्या OFF PERIOD सदरात लेख प्रकाशित होतात.विविध भाषिक,मनोरंजक ,शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी शब्दाकोडयांची विपुल प्रमाणात निर्मिती.दैनिक देशोन्नती च्या फन क्लब पेज वर मागील दीड वर्षांपासून दर रविवारी प्रकाशित.विविध उपक्रमांच्या माध्यमातून अध्यापन.

नवीनतम लेख-
** मराठीच्या विकासासाठी हे करू या . . . . . .  
** मराठी - व्याकरण **
 ** तुम्हांला माहीत असलेले शब्द शोधा ज्यात शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावी **
- - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
** शाळेतल्या विद्यार्थ्याकरिता हा एक उत्तम उपक्रम असून यातून मराठी शब्द शुध्द लिहिण्याचा सराव होतो. हा एक शाब्दिक खेळ आहे, ज्यात मुले स्वतःहून शब्द शोधण्यास प्रारंभ करतात. त्यांना शब्द शोधण्यासाठी आपण फक्त मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
** या खेळाचा उपयोग काय होतो ? तर मुलांना शब्दाची अचूक ओळख होते आणि मराठीत काही मोजकीच शब्द वगळले तर सर्व शब्द ज्याच्या शेवटचे अक्षर क आहे त्यापूर्वीच्या अक्षरांवर पहिली वेलांटी येते हे मुलांना तात्काळ समजण्यासाठी मदत होते.
** अश्याच छोट्या छोट्या उपक्रम व खेळातून मुलांना मराठीच्या शब्दाची ओळख करून देता येईल.
** शब्दाची यादी तयार करण्याचे काम अर्थातच विद्यार्थ्याना लावले तर अजून मजा येईल. यादी तयार करीत असताना पाठ्यपुस्तक वापरणे बंधनकारक करावे. शब्द अंदाजे लिहू नये. शुद्ध शब्द लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तक वापरण्याचा आग्रह धरल्यास मुले अचूक शब्द लिहितिल अन्यथा पुन्हा चूका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
** हा उपक्रम आपण तिसऱ्या वर्गपासून घेता येवू शकतो.
** हा उपक्रम खालील प्रकारात विभागणी करून यादी तयार करावी.
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे तीन अक्षरी शब्द शोधा -
* उदा. - आर्थिक
 - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे चार अक्षरी शब्द शोधा -
उदा. - सामाजिक
 - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे पाच अक्षरी शब्द शोधा -
उदा. - राजनैतिक
 - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
* शब्दाच्या शेवटी " क " असावे आणि त्यापूर्वी वेलांटी असावे असे सहा अक्षरी शब्द शोधा -
उदा. - नियतकालिक
 - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
प्रत्येक शब्द प्रकारात आपण भर टाकावी

चला तर मग . . . . . . . . .
आपण शब्द शोधू या आणि आपली व आपल्या विद्यार्थ्यांची मराठी शब्दसंपत्ती वाढवू या.
 - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
नोट : -
** हा खेळ तुम्हांला कसा वाटला . . ?
** विद्यार्थ्यांनी कसा प्रतिसाद दिला . . . . ?
** या उपक्रमाचा काही फायदा आपणास झाला काय . . . ? किंवा
** या उपक्रमात काही त्रुटी, कमतरता, चुका असल्यास, वा काही बदल करावा असे आपणास वाटत असेल तर . . . . . . .
 - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
जरूर आपले मत व्यक्त करावे. आपल्या अभिप्रायाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद.
 - - - - - - - - - - ************- - - - - - - - - -
आपले मत येथे व्यक्त करा
** nagorao26@gmail.com
** 9423625769 

- तस्मै श्री गुरवे नम:
आपण सर्वत्र शिक्षकदिन मोठय़ा थाटात साजरा केला. 'गुरूब्रम्हा, गुरूविष्णू, गुरूदेवो महेश्‍वर: गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै री गुरवे नम: भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला खूप मोठे आदराचे स्थान आहे. गुरूमुळे जीवनातील अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरतो. म्हणूनच पुरातन काळ म्हणजे रामायण व महाभारताच्या काळापासून गुरूला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या काळातील राजे-महाराजे गुरूच्या सल्ल्याशिवाय पुढील मार्गक्रमण ठरवीत नसत. राजे गुरूंना आदर व सन्मान देत असत त्यामुळे राज्यातील जनता सुद्धा त्यांचा आदर करीत असत. गुरूच्या मनाविरूद्ध वागल्यास गुरू क्रोधीत होतील. त्यांना संताप येईल आणि रागाच्य भरात शाप देतील अशी भिती सुद्धा लोकांच्या मनात होती. याचाच अर्थ समाजात गुरूचा फार मोठा दबदबा होता. त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी करून घेण्याची कला राजा जवळ असणे आवश्यक होती. त्याकाळात गुरूगृही जाऊन विद्या शिकण्याची पद्धत होती ज्यास 'गुरूकूल' पद्धत असे संबोधल्या जाई. परंतु या गुरूकूल मध्ये काही ठराविक लोकांनाच विद्यादान केल्या जात असे. कारण द्रोणाचार्य गुरूंनी एकलव्यास विद्या शिकविण्यास नकार दिला होता परंतु त्याच्या गुरू भक्तीमुळे त्याला ज्ञान मिळविता आले. याचा एक अर्थ आपण असा काढू शकतो की, त्याकाळी सुद्धा गुरूंना शासनाचेच (राजांचे) ऐकावेच लागत असे. राजाच्या परवानगी शिवाय राजगुरूला कोणालाही शिकविता येत नव्हते.

कालाय तस्मै नम: नुसार काळ बदलत गेला आणि त्या अनुषंगाने समाज सुद्धा बदलत गेला. गुरूच्या घरी जाऊन शिकण्याच्या पद्धतीत हळूहळू बदल होत गेला. गुरूची जागा शिक्षकाने घेतली. समाजात आज वेगवेगळया क्षेत्रात वेगवेगळे प्रकारचे गुरू आहेत. मात्र समाजाचा सर्वात जास्त विश्‍वास ज्या गुरूवर आहे तो म्हणजे शिक्षक. परिस्थितीनुसार काळ बदलत राहतो आणि काळानुरूप परिस्थिती बदलते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले, त्यांना शाळेतला गुरू लाभलाच नाही तर ते एवढे मोठे साहित्यिक कसे झाले? गुरूदेव रविंद्रनाथ टागोर एक दिवस शाळेत जाऊन एवढे महान कवी कसे बनले? कवयित्री बहिणाबाई चौधरी एकही दिवस शाळेत न जाता प्रसिद्ध साहित्यिक कसे बनू शकल्या? तर त्याचे उत्तर आहे अनुभव. त्यांचा गुरू होता अनुभव आणि विलक्षण बुद्धीमत्ता यामुळे ते शक्य झाले. परंतु आपण सामान्य असलेले व्यक्ती आपणाला पदोपदी मार्गदर्शन करणारे, दिशा देणारे आणि रस्त्यावरून चालवत नेणार्‍या गुरूची गरज भासते. गुरूविना आपले जीवन अपूर्ण आहे.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगणारे महात्मा जोतिबा फु ले यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी क्रांतीजोती सावित्रीबाई फु ले यांनी सुद्धा अपार कष्ट सोसले. लोकांकडून त्यांचा खूप छळ केला गेला पण त्यांनी शैक्षणिक काम थांबविले नाही. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यात फु ले दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपणास गाव तेथे शाळा बघायला मिळत आहे.

मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असे सध्या जे बोलल्या जात आहे ते महात्मा फु लेंनी सन १८८२ मध्ये हंटर कमिश्नच्या समोर दिलेल्या साक्षी मध्ये म्हटले जाते. परंतु त्यांना त्याकाळी अनेक वाईट प्रसंग आणि अनुभवास तोंड द्यावे लागले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली परंतु त्या ठिकाणी श्किविण्यासाठी कोणीच तयार होईना. शिकविण्याचे काम बर्‍याच जणांना तुच्छतेचे वाटत असे. तसेच श्किविण्याचे काम हे येड्यागबाळ्याचे नाही. त्यासाठी खूप मोठी विद्या जवळ असावी लागते असा समज होता. परंतु जोतिबांनी आपल्या निरक्षर पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला शिकविले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान दिला. समाजात गुरूला कोणत्या संकटाला, त्रासाला तोंड द्यावे लागत होते याची प्रचिती यावरून आपणाला येते. समाजात हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. शिक्षणाचे महत्व लोकांना कळू लागले. देशातील नेते आणि पुढारी समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागले. शिक्षणाविषयी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.' त्याच सोबत ते लोकांना स्वत:चा समाजाचा विकास करायचा असेल तर 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र दिला. त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर श्क्षिणाचा खेडोपाडी दरी खोर्‍यात प्रसार केला. शाळा तर उघडल्या जात होत्या मात्र त्यांना शिकविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. सन १९९0 च्या दश्कापर्यंत मुलांना शिकविण्यासाठी 'शिक्षक' म्हणून नोकरी करण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या फारच कमी होती. कारण या काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजलं जात असे. त्यामुळे सहसा कोणी पुढे येत नव्हते. जे शिक्षक म्हणून काम करीत होते ते कधी तिकडे व्यवसाय म्हणून पाहिले नव्हते. ती त्यांची एक प्रकारे सेवा होती. असा त्यांचा स्वभाव होता.

निस्व:र्थ म्हणता येणार नाही परंतु जेवढे मिळते तेवढय़ावर समाधान मानून सेवाभावी मनाने काम करणारी शिक्षक मंडळी समाजात मानाचे स्थान मिळवून गेले.

आज शाळेतील शिक्षक मंडळी तणावाखाली वावरत आहेत असे म्हटले तर शिक्षकी पेशा सोडून जी मंडळी आहे त्यांना हसू येते आणि विनोदबुद्धी सुचते. मात्र जे या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना हे सत्य आहे असे वाटेल. शाळेमधून मुलांवर संस्कार करण्याचे काम शिक्षकांनी करणे खरे तर आवश्यक आहे. मात्र किती शाळेतून मुलांवर संस्कार केले जातात. याची चाचपणी केल्या जात नाही. कारण आज त्यांना अभ्यासक्रमासमोर संस्कार काहीच वाटत नाही. येथूनच समाज रसातळाला जाणे प्रारंभ झाली म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. समाजात आज सुद्धा तस्मै श्री.गुरवे नम: ची खरी गरज आहे. फक्त शिक्षक दिन आले म्हणून शिक्षकांचा सन्मान किंवा सत्कार न करता या दिवसांसारखे रोजच त्यांना सन्मान देणे खरेच गरजेचे आहे असे वाटते.

मो. ९४२३६२५७६९




@ मराठी शब्दसंपत्ती वाढविण्याचा उपक्रम @



👫 जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली
ता. धर्माबाद जि. नांदेड 👫

मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी मी घेतलेला एक छोटा सा उपक्रम ज्यामुळे मुले उत्साही तर झालीच शिवाय त्यांना मराठी भाषेतील समान अर्थी शब्दाची ओळख ही झाली

*** रीत :सर्वात पहिल्यांदा वर्गातील मुलांना " आज आपण एक खेळ खेळूया " अशी सुरुवात केल्यास मुले प्रोत्साहित होतील आणि आपणास प्रतिसाद मिळेल. ज्या वेळी मुले अभ्यास करून खूपच कंटाळून जातात त्यावेळी या खेळाचा वापर केल्यास त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतात. खेळाची सुरुवात
" शब्दांच्या शेवटी - - - - येणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा."

मुले त्यांना माहीत असलेले खूप शब्द लिहतिल. ते सर्व उत्तरे स्विकार करावे.

**** त्यात सुधारणा काय करावी ?
असे शब्द लिहिल्यानंतर " आत्ता तुम्हांला ज्या शब्दाचा समान अर्थी म्हणजे त्याच शब्दाचा दुसरा अर्थ माहीत आहे ते लिहा. "मुले त्यांना माहीत असलेल्या शब्दाचे समान अर्थी शब्द लिहतील यामुळे त्याचे समान अर्थी शब्दाचे दृढीकरण करून घेता येईल. आणि ज्या शब्दाचे समान अर्थी शब्द मुलांना लिहिता आले नाही ते समान अर्थी शब्द आपण सांगायचे. वर्गातील सर्व मुलांच्या शब्दाचे संकलन करून आपण आपला नवीन मराठी शब्द कोश तयार करता येवू शकेल.

**** कोडे कोणी सोडवावे :

वरील कोडे शाळेतल्या मुलांकडुन किंवा आपल्या घरातील शालेय मुलांकडुन सोडवून घेण्याचा प्रयत्न करा.
इयत्ता 4 थी ते10 वी या वर्गात खूपच प्रतिसाद मिळेल याची मला खात्रीआहे.

**** प्रतिसाद द्यावे : तेंव्हा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला किंवा काय समस्या उद्भवल्या हे या ग्रुप वर किंवा माझ्या पर्सनल अकाउंटवर पोस्ट करायला विसरू नका.पोस्ट टाकते वेळी मात्र आपले नाव व शाळेचे नाव टाकण्यास विसरू नका. शक्य असल्यास या पोस्ट ला तुमच्या इतर ग्रुप मध्ये फॉर्वर्ड करणे.

nagorao26@gmail.com या ई मेल वर किंवा +919423625769 या whatsapp क्रंमाकावर आपल्या प्रतिक्रिया जरूर पाठवावे

विविध प्रकारचे कोडे पाहण्यासाठी खालील लिंक पहा
www.fb.com/shabdakodi

दैनिक देशोन्नतीच्या फनक्लब पेज वर दर रविवारी प्रकाशित झालेली
 नागोराव सा. येवतीकर सर यांचे लहान मुलांसाठी बनविण्यात आलेले शब्दकोडे-व -विविध शैक्षणिक लेख:









































7 comments:

नासा येवतीकर 9423625769 said...

मला आपल्या ब्लॉग वर जागा दिल्या बद्दल मी आपला अन्त्यत आभारी आहे. धन्यवाद

Suhaskolekar said...

प्लीज सर,धन्यवाद नका म्हणू,मला त्यात आनंदच वाटतो.कृपया भेट देत रहा.

नासा येवतीकर 9423625769 said...

सर्व लेख एकत्र पाहताना खूप आनंद होत आहे श्रीरंग सर आपल्यामुळेच हे शक्य झाले मी माझ्या मित्रांना आणि वाचकांना लिंक देऊन ही संधी देता येऊ शकेल

नासा येवतीकर 9423625769 said...

श्रीरंग ऐवजी सुहास असे वाचावे

नासा येवतीकर 9423625769 said...

खुपच छान . . . . . !

Pame Multi Services said...

खुपच छान..आपल्या कार्यास शुभच्छा श्री गजानन दिगंबर पामे
www.pame.info
gdpame@gmail.com

Uday Shillare said...

ITS VERY GOOD NASA